एक लांब लांब रस्ता होता.
त्याच्या एका टोकाशी, एका मुलाने एका मुलीला विचारलं की तू माझ्याबरोबर ह्या रस्त्यावर चालशील का?
सोमरस पिता पिता हा लांबचा रस्ता आपण सहज काटू!
"पण मला सोमरस पिता येत नाही! आणि कोणी दुसऱ्याने प्यायलेला देखील मला आवडत नाही! "
"असं म्हणतेस? ठीक आहे मी नाही पिणार. पण तू माझ्याबरोबर चालच!"
ती मुलगी त्या वचनावर विश्वास ठेवून, त्याचा हात धरून चालू लागली.
काही दिवसांनी तो सोमरस पीत असता
तिने त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं,'हे तू कधी थांबवणार ?"
तो म्हणाला," आज नाही. पण २ वर्षांनी नक्की!"
थोडी वर्ष गेली. तिने परत त्याला विचारलं," कधी?"
"आत्ता नाही. अजून थोड्या वर्षांनी."
थोडा अजून कालावधी गेला. रस्ता बराच कटला होता.
तिने पुन्हा त्याला विचारलं.
पण आता तो म्हणाला," तू खूपच हट्ट करतेयस! आणि म्हणून मी कधीच सोमरस पिण्याचे नाही सोडणार!"
पण मग १०-१५ वर्षांपूर्वी, हा प्रवास सुरु करण्याआधीच तर ते वचन दिलं गेलं होतं ना?
खरं तर त्या वचनावरच तर तो प्रवास एकत्र सुरु केला होता ना?
"वचन? Don't take it seriously!"
Friday, 16 April 2010
मी देव नाही!
आपण माणसे आहोत, देव नाही.
period!
आपण चुकतो.
पुन्हापुन्हा चुकतो!
फक्त आपण आपली झालेली चूक समजून घेतो का?
आणि आपण केलेल्या चुकांमुळे जर दुसऱ्याकडून एक अपराध होत असेल तर
ते समजून न घेताच स्वतःला देव मानून, न्यायासनावर बसून दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करतो? त्यांना शिक्षा फर्मावतो?
स्वतःची चूक मान्य करता येणे हे आता मला प्रचंड मानसिक शक्तीचं काम वाटायला लागलय!
अहो सर्वांना जमताना दिसत नाहीये ते!
म्हणजे एकदम 'rare species' म्हणता येईल ह्या लोकांना!
आणि extinct देखील!
period!
आपण चुकतो.
पुन्हापुन्हा चुकतो!
फक्त आपण आपली झालेली चूक समजून घेतो का?
आणि आपण केलेल्या चुकांमुळे जर दुसऱ्याकडून एक अपराध होत असेल तर
ते समजून न घेताच स्वतःला देव मानून, न्यायासनावर बसून दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करतो? त्यांना शिक्षा फर्मावतो?
स्वतःची चूक मान्य करता येणे हे आता मला प्रचंड मानसिक शक्तीचं काम वाटायला लागलय!
अहो सर्वांना जमताना दिसत नाहीये ते!
म्हणजे एकदम 'rare species' म्हणता येईल ह्या लोकांना!
आणि extinct देखील!
माझा आयुष्याचा मंत्र
मी एक स्वतःवर खूष असलेला आत्मा आहे.
म्हणजे बघा, मी एकदाही होर्न न वाजवा ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जेंव्हा drive करते तेंव्हा मी स्वतःवर खूष होते.
मी फेरीवाल्यांकडून खरेदी न करता दुकानात जाऊन जेंव्हा खरेदी करते तेंव्हा मी स्वतःवर खूष होते.
मी एखाद्या brief वर छानपैकी काम करते तेंव्हाही मी स्वतःवर खूष होते.
आणि शिवाजी पार्कला निदान ४ फेऱ्या तरी मारल्या की देखील मी खूषच होते!
मस्त कॉफी केली की खूष आणि लेकीने छान नाश्ता केला की मी खूष!
पिंपळाला फुटलेलं गुलाबी पान बघितलं की खूष आणि कधीतरी दिसणारा तो छोटासा पक्षी आमच्या छोट्याश्या बागेत दिसला की मी खूष!
तुम्हाला मी सांगते, मी ना एक स्वतःवर खूष असलेला आत्मा आहे!
म्हणजे बघा, मी एकदाही होर्न न वाजवा ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जेंव्हा drive करते तेंव्हा मी स्वतःवर खूष होते.
मी फेरीवाल्यांकडून खरेदी न करता दुकानात जाऊन जेंव्हा खरेदी करते तेंव्हा मी स्वतःवर खूष होते.
मी एखाद्या brief वर छानपैकी काम करते तेंव्हाही मी स्वतःवर खूष होते.
आणि शिवाजी पार्कला निदान ४ फेऱ्या तरी मारल्या की देखील मी खूषच होते!
मस्त कॉफी केली की खूष आणि लेकीने छान नाश्ता केला की मी खूष!
पिंपळाला फुटलेलं गुलाबी पान बघितलं की खूष आणि कधीतरी दिसणारा तो छोटासा पक्षी आमच्या छोट्याश्या बागेत दिसला की मी खूष!
तुम्हाला मी सांगते, मी ना एक स्वतःवर खूष असलेला आत्मा आहे!
Thursday, 15 April 2010
आयुष्य - एक 'personalty development' course
आयुष्य म्हणजे एक 'personalty development' चा course आहे. म्हणजे बघा, आयुष्यात आपल्यासमोर वेगवेगळे प्रसंग येत असतात. बरे आणि वाईट. त्यातून आपण शिकत असतो, आपले धडे घेत असतो.
समजा एक प्रसंग घडला, जर आपण तो आपल्या development साठी वापरायचा म्हटला तर त्या प्रसंगातून आपण चांगलंच शिकून बाहेर पडू शकतो. आपण विचारांच्या दृष्टीने अधिक प्रौढ होऊ शकतो. अधिक खंबीर होऊ शकतो.
पण जर का आपण तो प्रसंग आपल्या अंगावर घेऊन, कोसळूनच गेलो, तर आपला विनाश अटळ. अगदी त्याच वेळी नाही तरी तो आपण आपल्या जवळ खेचून घेणार हे नक्की!
ह्याचा अर्थ जेंव्हा आपण जन्मतो तेंव्हा आपण या आयुष्याच्या शाळेत 'personalty development'शाखेत प्रवेश घेतो!
मग जेव्हा ही शाळा संपते तेंव्हा आपण हा course कशा प्रकारे केला हे आपण गेल्यावर समाजाचे किती आणि काय प्रमाणात नुकसान झाले ह्यावर ठरते.
असे अर्थात मला वाटते!
समजा एक प्रसंग घडला, जर आपण तो आपल्या development साठी वापरायचा म्हटला तर त्या प्रसंगातून आपण चांगलंच शिकून बाहेर पडू शकतो. आपण विचारांच्या दृष्टीने अधिक प्रौढ होऊ शकतो. अधिक खंबीर होऊ शकतो.
पण जर का आपण तो प्रसंग आपल्या अंगावर घेऊन, कोसळूनच गेलो, तर आपला विनाश अटळ. अगदी त्याच वेळी नाही तरी तो आपण आपल्या जवळ खेचून घेणार हे नक्की!
ह्याचा अर्थ जेंव्हा आपण जन्मतो तेंव्हा आपण या आयुष्याच्या शाळेत 'personalty development'शाखेत प्रवेश घेतो!
मग जेव्हा ही शाळा संपते तेंव्हा आपण हा course कशा प्रकारे केला हे आपण गेल्यावर समाजाचे किती आणि काय प्रमाणात नुकसान झाले ह्यावर ठरते.
असे अर्थात मला वाटते!
Tuesday, 13 April 2010
मी अपराधी..
मी एक bag घेऊन घरातून लग्न करून निघाले.
हॉल मधून निघालो तेव्हा रात्र झालेली होती..
दूरचा प्रवास. मुंबई ते डोंबिवली. लांबच लांब काळोखी रस्ता.
बाजूला नवीन नवरा.
झोप लागली तेंव्हा माझं डोकं खिडकीच्या तावदानावर आपटू नये म्हणून त्याने स्वतःचा हात तावदानावर ठेवलेला अजून आठवतं.
त्या दिवशी वयाच्या बाविसाव्या वर्षी मी स्वतःच्या सुखाची जबाबदारी नवऱ्यावर टाकली तेंव्हा हे सुख म्हणजे काय असते ते मला स्वतःला तरी कळले होते काय?
किंवा नवराच्या सुखाची जबाबदारी स्वतःवर घेतली तेंव्हा त्याचे सुख म्हणजे काय ते मला कळले होते काय?
नाही. नव्हते कळले.
मग पुढील काही वर्षांमध्ये माझी त्याच्याबद्दलच्या तक्रारींची यादी वाढली.
का?
कारण एकच.
लग्न करताना स्वतःचे सुख कशात आहे हे स्वतःच समजून न घेता त्या न कळलेल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे हा मोठा अपराध नव्हे काय?
Am guilty.
हॉल मधून निघालो तेव्हा रात्र झालेली होती..
दूरचा प्रवास. मुंबई ते डोंबिवली. लांबच लांब काळोखी रस्ता.
बाजूला नवीन नवरा.
झोप लागली तेंव्हा माझं डोकं खिडकीच्या तावदानावर आपटू नये म्हणून त्याने स्वतःचा हात तावदानावर ठेवलेला अजून आठवतं.
त्या दिवशी वयाच्या बाविसाव्या वर्षी मी स्वतःच्या सुखाची जबाबदारी नवऱ्यावर टाकली तेंव्हा हे सुख म्हणजे काय असते ते मला स्वतःला तरी कळले होते काय?
किंवा नवराच्या सुखाची जबाबदारी स्वतःवर घेतली तेंव्हा त्याचे सुख म्हणजे काय ते मला कळले होते काय?
नाही. नव्हते कळले.
मग पुढील काही वर्षांमध्ये माझी त्याच्याबद्दलच्या तक्रारींची यादी वाढली.
का?
कारण एकच.
लग्न करताना स्वतःचे सुख कशात आहे हे स्वतःच समजून न घेता त्या न कळलेल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे हा मोठा अपराध नव्हे काय?
Am guilty.
Thursday, 1 April 2010
वेग तरण्याचा
मी मुंबईच्या रस्त्यावर रोज गाडी चालवते.
एकदा इतर गाड्यांशी शिवाशिवी खेळत असता एक विचार आला.
त्या रस्त्याचा, त्या वेळेचा एक ठराविक वेग असतो. तोच वेग मीही माझ्या गाडीला द्यावा हे एक गृहीत असते.
जर तसे नाही झाले तर इतर वाहने मला सांगू लागतात की बाई ग, तू एकतर आमचा वेग घे नाहीतर आमच्या रस्त्यातून दूर हो!
मग हेच आपल्या जीवनाच्या प्रत्येक मार्गावर आपल्या लक्षात नाही का येत?
माझे कामाचे क्षेत्र जाहिरातीचे. या माझ्या क्षेत्राचा स्वतःचा एक वेग. एकदम जलद!
तेच जेंव्हा मी कामानिमित्त महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाते, तेंव्हा त्यांचा कामाचा वेग उलट! अतिशय हळू!!
आता तुमच्या लक्षात येतोय माझा मुद्दा?
अहो, जसा मी रस्त्याचा वेग नाही पकडला तर रस्त्यावरची प्रत्येक गाडी माझ्याविरुद्ध उठाव करते आणि मला बाजूला सारते, तसेच महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये देखील मला त्यांचाच वेग घेऊन चालावे लागते!
माझा वेग घेऊन मी त्यांना नाही चालवू शकत!! मला सरळ तासंतास एका खुर्चीत बसवून ठेवतात ते!
म्हणजेच त्यांच्या मार्गातून बाजूलाच सरतात कि ते मला!
तेंव्हा मित्रा, या जगात निभाव लागायला हवा असेल तर या जगाचा वेग पकडायला हवा तुला! काय?
एकदा इतर गाड्यांशी शिवाशिवी खेळत असता एक विचार आला.
त्या रस्त्याचा, त्या वेळेचा एक ठराविक वेग असतो. तोच वेग मीही माझ्या गाडीला द्यावा हे एक गृहीत असते.
जर तसे नाही झाले तर इतर वाहने मला सांगू लागतात की बाई ग, तू एकतर आमचा वेग घे नाहीतर आमच्या रस्त्यातून दूर हो!
मग हेच आपल्या जीवनाच्या प्रत्येक मार्गावर आपल्या लक्षात नाही का येत?
माझे कामाचे क्षेत्र जाहिरातीचे. या माझ्या क्षेत्राचा स्वतःचा एक वेग. एकदम जलद!
तेच जेंव्हा मी कामानिमित्त महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाते, तेंव्हा त्यांचा कामाचा वेग उलट! अतिशय हळू!!
आता तुमच्या लक्षात येतोय माझा मुद्दा?
अहो, जसा मी रस्त्याचा वेग नाही पकडला तर रस्त्यावरची प्रत्येक गाडी माझ्याविरुद्ध उठाव करते आणि मला बाजूला सारते, तसेच महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये देखील मला त्यांचाच वेग घेऊन चालावे लागते!
माझा वेग घेऊन मी त्यांना नाही चालवू शकत!! मला सरळ तासंतास एका खुर्चीत बसवून ठेवतात ते!
म्हणजेच त्यांच्या मार्गातून बाजूलाच सरतात कि ते मला!
तेंव्हा मित्रा, या जगात निभाव लागायला हवा असेल तर या जगाचा वेग पकडायला हवा तुला! काय?
माझं आठवणीचं कपाट.
माझं एक मोठं पुस्तकाचं कपाट आहे. मी त्यात माझ्या आवडीची पुस्तकं ठेवते. जी पुस्तकं मला नेहमीच आनंद देऊन जातात तीच ठेवते.
खूप दिवसांपासून एक विचार मनात घोळतोय. जर माझं डोकं हे असचं एक प्रचंड मोठं आठवणींच कपाट असेल तर मग मी त्यात ज्यांचा मला फक्त त्रासच होतो अश्या आठवणी क्रमवार, दिवसावर आणि व्यक्तीवार का लावून ठेवते? का त्या रोज उठून चाळत बसते? चुकीचं नाही का हे? म्हणजे मला आता हे माझं मनाचं कपाट लवकरात लवकर साफ करायला हवं! त्रासदायक गोष्टी नष्ट करायला हव्यात! नाही तर चांगल्या सुंदर गोष्टींना, आठवणींना कशी जागा होणार या माझ्या कपाटात? काय वाटतं तुम्हाला?
खूप दिवसांपासून एक विचार मनात घोळतोय. जर माझं डोकं हे असचं एक प्रचंड मोठं आठवणींच कपाट असेल तर मग मी त्यात ज्यांचा मला फक्त त्रासच होतो अश्या आठवणी क्रमवार, दिवसावर आणि व्यक्तीवार का लावून ठेवते? का त्या रोज उठून चाळत बसते? चुकीचं नाही का हे? म्हणजे मला आता हे माझं मनाचं कपाट लवकरात लवकर साफ करायला हवं! त्रासदायक गोष्टी नष्ट करायला हव्यात! नाही तर चांगल्या सुंदर गोष्टींना, आठवणींना कशी जागा होणार या माझ्या कपाटात? काय वाटतं तुम्हाला?
Subscribe to:
Posts (Atom)